बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून सलग १९ वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत ९० पैकी ९० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत असून त्यापैकी ६२ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. जान्हवी दिनेश कोळमकर हिने सर्वाधिक ९८.६० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला.
Read more