बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन…

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर रॅलीचे यशस्वी आयोजन केले. या रॅलीत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी वाचवा असे नारे दिले. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व कीर्ती चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. रॅली शाळेपासून परिसरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पाण्याचे महत्व, प्लास्टिक बंदी यावर लक्ष वेधले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण झाले. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. शाळेतील शिक्षिका यांनी सुद्धा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या सक्रिय सहभागाचे संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब देव, सचिव मोहन गद्रे, सहसचिव वैशाली देशपांडे, कार्यकारणी सदस्या अनघाताई देव तसेच सर्व शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले व असेच समाजाभिमुख विद्यार्थी व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.