बाल शिवाजी माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न……

बाल शिवाजी शाळेत बुधवार दि. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. अपेक्षा आवळे यांनी कामगार दिन विषयीची महती सांगताना समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहणे गरजेचे व ते आपले कर्तव्यच आहे. असे प्रतिपादन केले. पियुष काळे याने आजचा महाराष्ट्र व महाराष्ट्राची प्रगती आपल्या भाषणातून विशद केली. तसेच श्रीप्रसाद देशमुख यांनी कामगारांसाठी झटणाऱ्या कै. श्रीपाद अमृत डांगे व कै. श्री मेघाजी लोखंडे यांचे कार्य आपल्या भाषणातून सांगितले महाराष्ट्राचा अभिमान वृद्धिंगत करणारे, “गर्जा महाराष्ट्र माझा “हे गीत शाळेतील शिक्षिकांनी सादर केले. यानंतर इयत्ता चौथी व इयत्ता सातवी साठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थी पार्थ विक्रम घाईट वर्ग ४ था व इयत्ता ७ वी मधून अर्णव रवींद्र भांबेरे या दोन्ही विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर व संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व डॉ. राजेंद्र मेंडकी  यांनी पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच यावर्षीपासून संस्थेने शिक्षिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट शिक्षिका हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये 2024-25 या सत्रात प्राथमिक गटातून सौ. नीलिमा चंद्रकांत चव्हाण तसेच माध्यमिक गटातून सौ. रश्मी श्रीराम जोशी यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे संस्थेचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसासह सन्मानपत्र देऊन या दोन्ही उत्कृष्ट शिक्षकांना गौरविण्यात आले. श्री. अविनाश देव सरांनी विद्यार्थ्यांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित न होऊ देता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’  ने करण्यात आली. या का कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर,  कार्यकारणी सदस्य डॉ. राजेंद्र मेंडकी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चोपडे, शिक्षिका, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा मेतकर हिने केले.